उद्धवा अजब तुझे सरकार!! देशद्रोही आता देशभक्त झाले!! - किरीट सोमय्यांचं


काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षानं महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. 'शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी न सोडणारे भाजपचे मुंबईतील माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 'उद्धवा, अजब तुझे सरकार।देशद्रोही आता देशभक्त झाले।' असं सोमय्यांनी म्हटलं आहे.


उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. ठाकरे सरकारमध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात काँग्रेसचे मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांचाही समावेश आहे. मात्र, अस्लम शेख यांच्या नावाला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं आक्षेप घेतला आहे.

No comments

Powered by Blogger.