 |
महागाईवरून प्रियंकांचा सरकारवर निशाणा |
प्रियंका
गांधी यांनी ट्विटरवरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. भाजीपाला आणि
खाण्याच्या पदार्थांचे भाव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत.
भाज्या, तेल, डाळ आणि पीठचे दरही वाढले असून गरिबांनी काय खावं?, असा सवाल
करतानाच मंदीमुळे लोकांच्या हातातील रोजगार गेला आहे. त्यांना कामही
मिळेनासं झालं आहे, असं प्रियंका गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान,
काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनीही आकडेवारीच्या आधारे सरकारला धारेवर
धरले आहे. अपूर्ण मॅनेजमेंटचं एक सर्कल पूर्ण झालं आहे. मोदी सरकार जुलै
२०१४मध्ये सत्तेत आलं तेव्हा महागाई दर
७.३९ टक्के होता. डिसेंबर २०१९मध्ये हा दर ७.३५ टक्के इतका झाला आहे, अशी
खोचक टीका चिदंबरम यांनी केली आहे. खाण्याच्या पदार्थांचे भाव १४.१२
टक्क्याने वाढले आहेत. भाजीपाल्याचे दर ६० टक्क्याहून अधिक झाले आहेत.
कांदा १०० रुपये किलो विकला जात आहे. याच अच्छे दिनचं भाजपने जनतेला
आश्ववासन दिलं होतं, अशी टीकाही त्यांनी केलीय.
महागाईने आकाशाला गवसणी घातल्याने काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजप सरकारने लोकांचा खिसा कापून त्यांच्या पोटावर पाय दिलाय, अशा शब्दांत प्रियंका गांधी यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे.
Post a Comment