भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोरोना मुळे हा निर्णय घेतला

Image result for indian cricket board
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोरोना मुळे हा निर्णय घेतला
 भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला वनडे सामना पावसामुळे रद्द झाला. एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द करावा लागला. त्यामुळे चाहत्यांना मैदानावर किंवा टीव्हीवर देखील सामना पाहता आला नाही. आता मालिकेतील दोन सामने चाहत्यांना घरी बसूनच पाहावे लागतील. करोना व्हायरसच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा आणि तिसरा सामना रिकाम्या मैदानात म्हणजेच प्रेक्षकांशिवाय खेळवला जाणार आहे. दोन्ही संघादरम्यान १५ मार्च रोजी दुसरी वनडे लखनऊ येथे तर १८ मार्च रोजी कोलकाता येथे तिसरी वनडे खेळवली जाणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

करोना व्हायरसमुळे सरकारने बीसीसीआयला सामने प्रेक्षकांशिवाय खेळवण्याचे आदेश दिले होते. फक्त क्रिकेटच नाही तर क्रीडा सामने देखील प्रेक्षकांशिवाय घेतले जात आहेत.

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि प्रत्येक राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. केंद्राच्या आदेशानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरनाला आपत्ती म्हणून जाहीर केले. बीसीसीआय बरोबरच उत्तर प्रदेश सरकारने दुसऱ्या सामन्यासाठी प्रेक्षकांना मैदानावर प्रवेश दिला जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

मैदानावर फक्त कॅमेरा टीम, वैद्यकीय अधिकारी, स्टेडियमधील कर्मचारी यांनाच प्रवेश दिला जाईल. हा प्रवेश देखील तपासणी केल्यानंतरच दिला जाणार असल्याचे उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने म्हटले आहे.


No comments

Powered by Blogger.