पाकिस्तानात गव्हाच्या पीठाची तीव्र टंचाई
![]() |
पाकिस्तानात गव्हाच्या पीठाची तीव्र टंचाई |
पाकिस्तानातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,
पाकिस्तानात निर्माण झालेली गव्हाच्या पीठाच्या तुटवड्याची समस्या तेव्हाच
नियंत्रणात येईल, जेव्हा २० मार्चपर्यंत सिंध आणि १५ एप्रिलपर्यंत पंजाब
प्रांतात नवे गव्हाचे पीक काढले जाईल.
पाकिस्तानातील या समस्येवरुन पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष आणि
संसदेतील विरोधीपक्ष नेते नवाज शरीफ यांनी इम्रान खान सरकारवर टीका केली
आहे. तसेच पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी
देखील या समस्येसाठी इम्रान खान सरकारलाच जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने
४०,००० टन गव्हाचे पीठ अफगाणिस्तानला निर्यात केल्याने ही समस्या निर्माण
झाल्याचा आरोप भुट्टो यांनी केला आहे.
Post a Comment